‘जनसंपर्क’च्या माध्यमातून केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साधणार नागरिकांशी संवाद

नागपूर, दि. १८ मार्च – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी रविवारी (दि. १९ मार्च) नागपूर येथील खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात ‘जनसंपर्क’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेणार आहेत. नागरिकांनी सकाळी ११ वाजता कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी, समस्या लगेच सोडवण्याच्या उद्देशाने ‘जनसंपर्क’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. नागपूरसह संपूर्ण राज्यातून नागरिक आपल्या समस्या, अडचणी आणि तक्रारी घेऊन येतात. रविवारीदेखील श्री गडकरीजी ‘जनसंपर्क’च्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यासह त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *